आदर्श नागरिक मराठी निबंध | Adarsh nagrik marathi nibandh कोणत्याही देशाचे नागरिक हेच त्या देशाची संपत्ती असतात. जर देशाचे नागरिक आदर्श, मेहनती आणि सज्जन असतील तरच देश प्रगती करतो. एक आदर्श नागरिक सर्वात आधी एक आदर्श व्यक्ती असतो. तो नेहमी देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी कार्यरत असतो. असा व्यक्ती आपल्या देशाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतो. आपल्या भारत देशात अनेक प्रसिद्ध असे आदर्श नागरिक होऊन गेले आहेत. जसे महात्मा गांधी, भगत सिंह, लोकमान्य टिळक, डॉ एपीजे अब्दुल कलाम इत्यादी. या महापुरुषांनी इमानदारी च्या मार्गावर चालत देशाच्या प्रगतीत सहकार्य केले. सोबतच भारतच नव्हे तर जगभरातील लोकांसमोर आदर्श निर्माण केला. आदर्श नागरिकाचे अनेक गुण असतात. एक आदर्श नागरिक इमानदार, कर्तव्यनिष्ठ आणि सत्य मार्गावर चालणारा असतो. तो आपल्या देशाची संस्कृती, इतिहास आणि भुमिशी प्रेम करतो. आदर्श नागरिकाच्या मनात देशप्रेम भरलेले असते. तो देशाविषयी आपल्या कर्तव्यांना पुरेपूर बजावतो आणि नेहमी आपल्या कर्तत्व्या प्रति जागरूक असतो. असा नागरिक वेळप्रसंगी देशासाठी आपले प्राण देण्यासही तयार असतो. एक चांगला नागरिक