Advertisement

[मोबाइल श्राप की वरदान] मराठी निबंध | Mobile shap ki vardan Essay in Marathi

मोबाइल श्राप की वरदान मराठी निबंध | mobile shap ki vardan nibandh

(550 शब्द)

आज कालचे जग मोबाईल शिवाय अपूर्ण आहे.‌ मनुष्याद्वारे केलेल्या शोधामध्ये मोबाईल हे एक महत्त्वाचे साधन आहे. आज एकविसाव्या शतकात मनुष्य मोबाईल शिवाय राहू शकत नाही. दिवसाची सुरुवात मोबाईलच्या अलार्म ने होते. व्यवसाय किंवा नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या संपर्कात राहणे मोबाईल मुळे सोपे झाले आहे. आजकाल तरुणांमध्ये मोबाईल चे चलन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मोबाईल हा त्यांच्या जीवनाचा महत्वाच्या भाग बनला आहे. बाजारात देखील मोबाईलचे वेगवेगळी विशेषता असणारे मॉडेल उपलब्ध आहेत आणि तरुणांमध्ये नवीन नवीन मॉडेल घेण्याचा क्रेझ वाढत आहे.


लहान लहान मुले आपला अभ्यास पूर्ण झाल्यावर आई-वडिलांकडून गेम्स खेळायला मोबाईल मागतात. मोबाईल मुळे आपण कोणत्याही स्थानाच्या नकाशा मिळवू शकतो व  कोणाचीही मदत न घेता तेथे पोहचू शकतो. मोबाईल ही विज्ञानाची अमूल्य देण आहे. मोबाईल ने आपले जीवन सोपे बनवले आहे. मोबाईल मुळे आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या लोकांशी बातचीत करू शकतो. व्हिडीओ कॉलिंग च्या माध्यमाने दूर असलेल्या नातेवाईकांना आपण पाहू शकतो.


मोबाईल मध्ये रेडिओ आणि mp3 प्लेयर सारखे फंक्शन्स असतात यांच्या मदतीने आपण गाणे व बातम्या ऐकू शकतो. मोबाईल मध्ये कॅल्क्युलेटर चे देखील फंक्शन असते म्हणून आता हिशोब करण्यासाठी सोबत मोठे कॅलकुलेटर सांभाळण्याची गरज नाही, मोबाईल च्या मदतीने आपण केव्हाही कॅल्क्युलेटर वापरू शकतो. जास्त करून लोक मोबाईल मध्ये व्हिडिओ आणि मूव्हीज पाहतात. यासाठी ते यूट्यूब ॲप चा वापर करतात. एका पद्धतीने मोबाईल ने संपूर्ण जगाला त्यात सामावून घेतले आहे. मोबाईल ला असलेल्या कॅमेऱ्याद्वारे आपण सुंदर फोटो काढू शकतात म्हणून बाहेर कुठे फिरायला जाताना सोबत कॅमेरा नेण्याची आवश्यकता नाही. कारण मोबाईल द्वारे अतिशय चांगली फोटो काढणे सरल झाले आहे. मोबाइलच्या पुढच्या बाजूला असलेल्या कॅमेऱ्याला सेल्फी कॅमेरा म्हटले जाते. या कॅमेर्‍याच्या मदतीने तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःची फोटो काढू शकतात.


मोबाईल मध्ये असलेल्या ॲप्स च्या मदतीने आपण ऑनलाइन खरीदारी करू शकतात. पूर्वीसारखे बाजारात जाऊन तासनतास वस्तू शोधण्याची आता गरज नाही. घरबसल्या मोबाईलवर आपण योग्य वस्तू शोधू शकतात व तिला ऑनलाईन ऑर्डर करू शकता. पैसे पाठवण्यासाठी देखील आता बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. मोबाईल मध्ये असलेल्या ऑनलाईन पेमेंट अँप च्या मदतीने घर बसल्या पैसे पाठवता येतात.


मोबाईल चे खूप सारे फायदे आहेत. जर कोणाला तात्काळ मदत हवी असेल तर इमर्जन्सी नंबर जसे पोलीस, ॲम्बुलन्स यांना फोन करून बोलवता येते. सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे. दररोज लोक सोशल मीडियावर आपले फोटो टाकत असतात. कमेंट्स च्या माध्यमाने एक दुसऱ्याच्या फोटो बद्दल कमेंट पण करतात.


मोबाईल चे अनेक फायदे आहेत. पण याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. मोबाइल द्वारे ब्लॅकमेलिंग चे प्रकार खूप वाढले आहेत. आई वडील हे कामावरून आलेत की मोबाइल मध्ये व्यस्त होऊन जातात. ज्या मुळे मुलानं सोबत त्यांना वेळ मिळत नाही. सर्व शुभेच्छा संदेश ऑनलाईन पाठवले जातात म्हणून आधी सारखा एक दुसऱ्याला भेटण्याचा आनंद येत नाही. 


आज मोबाईलच्या अतिवापराने लोकांना त्याचे व्यसन जडत आहे. युवकांमध्ये हे प्रमाण वाढत आहे. दीर्घकाळ मोबाईलवर गेम खेळणे, इंटरनेट वापरने यामुळे डोळ्यांना त्रास होतो. डोकेदुखी, डोळे चुरचुरणे यासारख्या समस्या वाढीस लागतात. खूप साऱ्या लोकांना रात्री झोपताना मोबाईल डोक्याजवळ ठेवण्याची सवय असते, पण असे केल्याने कॅन्सर चा धोका वाढतो. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्याने डोळ्यांवर ताण येतो व झोप कमी होते. मोबाईलचा जास्त वापराने एकाग्रता कमी होते. म्हणून लहान मुलांच्या हातात मोबाइल देणे जास्तीत जास्त टाळावे.


यात शंका नाही की मोबाईलचे खूप सारे फायदे आहेत व मोबाईल एक महत्त्वाचे साधन आहे. पण कोणत्याही नाण्याच्या दोन बाजू असतात. मोबाईलच्या बाबतीत देखील तसेच आहे. एकीकडे याचे सकारात्मक परिणाम आहेत तर दुसरीकडे नकारात्मक प्रभाव देखील आहेत. म्हणून मोबाईल वापरणाऱ्या नवीन तरुणांना त्याचे योग्य उपयोग समजावून दिले पाहिजे. मोबाईलचा वापर संतुलनात करायला हवा.

***

मोबाइल श्राप की वरदान निबंध | mobile shap ki vardan nibandh

(300 शब्द)

आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. या आधुनिक युगात महत्त्वाची भूमिका जो साकारत आहे तो म्हणजे आपल्या हातातील मोबाईल फोन. नवीन नवीन शोधामुळे मोबाईल फोन मध्ये सुद्धा वेगवेगळे परिवर्तन होत आहे. दर महिन्याला नवनवीन फीचर्स असलेले मोबाईल बाजारात येत आहेत. काहि वर्षाआधी मोबाईल फोन फक्त गप्पागोष्टी करण्यासाठी वापरला जायचं. परंतु आज इंटरनेट व तंत्रज्ञानाच्या विकासामुळे मोबाईल मध्ये अनेक गोष्टी करणे शक्य झाले आहे.


सुरुवातीला कीपॅड वाले मोबाईल यायचे, पण आता कीपॅड ची जागा टचस्क्रिन ने घेतली आहे. मोबाईलच्या आकार देखील वाढला आहे आणि खूप सारी माहिती इंटरनेटच्या द्वारे मिळत आहे. गरीब-श्रीमंत, लहान-मोठा, स्त्री-पुरुष सर्वांच्या हातात मोबाईल आहेत. मोबाइल कंपन्यांमध्ये वाढती प्रति स्पर्धेमुळे मोबाईल चे भाव कमी झाले आहे. इंटरनेट व कॉलिंग देखील भारतात अतिशय स्वस्त आहे.  


आजचा मोबाईल खूपच स्मार्ट आहे. या स्मार्टफोनमध्ये आपण घर बसल्या अनेक कामे करू शकतो. एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे पाठवण्यासाठी आता बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. घरबसल्या मोबाईलच्या एका क्लिकवर आपण पैसे पाठवू शकतो. काहीही खरेदी करण्यासाठी बाजारात जाण्याची देखील आवश्यकता नाही ऑनलाईन वेबसाईट च्या मदतीने घरबसल्या खरेदी करता येते. यासोबतच रेल्वे टिकीट बुकिंग, हॉटेल बुकिंग, फास्ट फूड, फ्लाईट बुक, रूम बुकिंग इ. कामे घरबसल्या करता येतात. कोणताही अतिरिक्त चार्ज न देता युट्युब वर मनोरंजन तसेच शिक्षणासाठी उपयुक्त व्हिडिओस पाहता येतात. व्हाट्सअप फेसबुक यासारख्या सोशल मीडिया ॲप्स च्या मदतीने नातेवाईक व मित्रमंडळींची संपर्क साधणे सोपे झाले आहे.


मोबाईल फोनमध्ये भरपूर सुविधा उपलब्ध आहेत. पण दुसरीकडे याचे दुष्परिणाम देखील आहेत. मोबाईलचे अत्याधिक दुष्परिणाम लहान मुले व तरुणांवर होत आहेत. मोठ्या आवाजात गाणे ऐकणे, दीर्घकाळापर्यंत मोबाईल वापरत राहणे, गेम्स खेळणे, सोशल मीडियाचा अती वापर करणे इत्यादी अनेक कारणांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात नुकसान होत आहे. मोबाईल द्वारे ऑनलाईन बँकिंगची सुविधा मिळाल्याने बँक अकाउंट मधून पैसे चोरीसारख्या हॅकिंग च्या समस्या वाढल्या आहेत. मोबाईल फोनमध्ये वायरस पाठवून गोपनीय माहिती चोरी करणे असे कार्य देखील केले जात आहेत.


एकीकडे मोबाईलचे सकारात्मक प्रभाव आहेत तर दुसरीकडे त्याचे दुष्परिणाम देखील आहेत. म्हणून मोबाईलचा कशा पद्धतीने सदुपयोग करावा हे वापरकर्त्यावर अवलंबून आहे. 

***