Advertisement

{मराठी भाषण} नेताजी सुभाष चंद्र बोस । Speech On Netaji Subhash Chandra Bose in Marathi

सुभाष चंद्र बोस जयंती भाषण मराठी (Subhash Chandra Bose jayanti Bhashan)

अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार.

आज मी तुमच्याशी एक अश्या नेत्यांबद्दल बोलणार आहे ज्यांनी मला सर्वात जास्त प्रेरित केले आहे. त्या महान नेत्याचे नाव आहे सुभाष चंद्र बोस.


सुभाष चंद्र बोस हे प्रभावशाली आणि क्रांतिकारी नेता होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात महत्वाची कामगिरी बजावली. भारतीय स्वतंत्रता युद्धात त्यांनी भारताबाहेर जाऊन आझाद हिंद फौज स्थापित केली. त्यांचे विचार क्रांतिकारी होते. 


सुभाष चंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 साली ओडिसा राज्यातील कटक शहरात एका बंगाली हिंदू कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस तर आईचे नाव प्रभावती होते. जानकीनाथ बोस हे कटक शहरातील प्रसिद्ध वकील होते. सुभाष चंद्र बोस हे कोलकाता विश्व विद्यालयातून पदवीधर झाले. या नंतर ते इंग्लंड ला गेले व तेथे सरकारी नोकरी ची तयारी करू लागले. सिव्हिल सर्व्हिस च्या या परीक्षेत ते चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. परंतु देशभक्ती आणि देशाला स्वातंत्र्य मिळून देण्याची इच्छा त्यांना शांत बसू देत नव्हती. एप्रिल 1921 मध्ये त्यांनी इंग्लंड मधील नागरिक सेवेतून राजीनामा दिला व ते परत भारतात आले. भारतात आल्यावर त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभाग घेतला. त्यांनी बंगाल आणि बंगालच्या आजूबाजूच्या परिसरातील युवकांना एकजूट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.


त्यांचे विचार गांधीवादी विचारां पेक्षा वेगळे होते. सुभाष चंद्र बोस इंग्रजांच्या अत्याचारी शासनाच्या विरोधात सशस्त्र क्रांती चे समर्थक होते. 1939 मध्ये जेव्हा द्वितीय महायुद्ध सुरू झाले. तेव्हा इंग्रजांनी त्यांना कोलकत्यात नजरबंद केले. परंतु सुभाष चंद्र बोस हे त्यांचा भाचा शिशिर कुमार बोस यांच्या मदतीने नजरकैदेतून बाहेर पडले. अफगाणिस्तान व सोव्हिएत संघाच्या मार्गाने ते जर्मनी गेले. जर्मनीत नेताजी हिटलर ला पण भेटले. या नंतर सिंगापूर ला जाऊन त्यांनी आझाद हिंद सेनेचे गठण करण्यास सुरुवात केली.


नेताजी आपल्या आझाद हिंद फौज सोबत 4 जुलै 1944 ल बर्मा पोहोचले. इथेच त्यांनी आपला प्रसिद्ध नारा, "तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दुंगा" दिला.


       18 ऑगस्ट 1945 ला टोकियो जाताना तैवान जवळ हवाई दुर्घटने दरम्यान नेताजींचा मृत्यू झाला, परंतु त्यांचे मृत शरीर मिळाले नाही. म्हणूनच नेताजींच्या मृत्यूच्या कारणांवर आज देखील विवाद सुरू आहे.


सुभाष चंद्र बोस जयंती भाषण मराठी (Subhash Chandra Bose jayanti Bhashan)

आज दिनांक 23 जानेवारी 2021, भारतीय स्वतंत्र लढ्यात महत्वपूर्ण योगदान देणारे क्रांतिकारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा हा जन्म दिवस. आज आपण नेताजींनी 124 वी जयंती साजरी करीत आहोत. ओडिसा मधील कटक शहरातले प्रसिद्ध वकील जानकी नाथ बोस व प्रभावती देवी यांच्या घरी सुभाष चंद्र बोस 23 जानेवारी 1897 ला जन्माला आले. त्यांचे प्रारंभिक शिक्षण कटक मध्येच झाले. उच्च शिक्षणासाठी ते कोलकत्ता विश्व विद्यालयात पोहोचले. कोलकत्यात त्यांनी 1919 मध्ये प्रथम श्रेणीत बी ए ची परीक्षा उत्तीर्ण केली. 


नेताजींच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी सरकारी नोकरी करावी. आपल्या वडिलांची इच्छा म्हणून नेताजींनी आयएएस ची परीक्षा दिली व या परीक्षेत त्यांनी चौथा क्रमांक मिळवला. परंतु देशाला गुलामीतून मुक्त करण्याची भावना नेताजींच्या मनात लहानपणापासून ठसलेली होती. त्यांनी एक वर्षाच्या आतच आपल्या नोकरी चा राजीनामा दिला. आणि देशाच्या स्वतंत्र कार्यात लागून गेले.


1941 साली नेताजी जर्मनी जाऊन अडोल्फ हिटलर ला भेटले व भारतीय स्वातंत्र्यासाठी मदत मागितली. भारतातून इंग्रजांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी आझाद हिंद फौज ची स्थापना केली. त्यांनी तरुणांना आव्हान केले की "तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दुंगा". या नंतर 1943 मध्ये नेताजी जपान च्या मदतीने सिंगापूर ला पोहोचले. सिंगापूर मध्ये मोहन सिंह द्वारे बनवलेली इंडियन नॅशनल आर्मी ची कमान आपल्या हाती घेतली. सुभाष चंद्र बोस यांनी सिंगापूर मधून रेडिओ वर संबोधन करताना गांधीजींना पहिल्यांदाच भारताचे राष्ट्रपिता म्हणून सन्मान दिला.


सुभाष चंद्र बोस यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या भाषणात देशाच्या जनतेला एक संदेश दिला होता. या भाषणात त्यांनी म्हटले होते "बंधू आणि भगिनींनो देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपण जे युद्ध सुरू केले आहे, याला तोपर्यंत सुरू ठेवा जोपर्यंत भारत स्वतंत्र होत नाही. धर्म पंथ आणि जात पात विसरून एकत्रित व्हा.


साल 20 जुलै 1921 मध्ये नेताजींनी महात्मा गांधीची भेट घेतली व वेगवेगळ्या सामाजिक कार्यात सहभाग घेत राहिले. या दरम्यान एकदा बंगाल मध्ये महापूर आला. नेताजींनी शिबिरे लावून प्रभावित लोकांना जीवनावश्यक वस्तू वाटणे सुरू केले. समाजसेवेच्या या कार्यासाठी त्यांनी 'युवक दलाची' स्थापना केली.


ज्यावेळी भगत सिंह यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तेव्हा नेताजी गांधीजी कडे गेले व त्यांनी भगत सिंह यांची शिक्षा रद्द करण्यासाठी आंदोलनाची विनंती केली. परंतु महात्मा गांधीनी त्याच्या या विनंती कडे दुर्लक्ष केले. या प्रसंगामुळे ते गांधीजी व काँग्रेस च्या कार्यपद्धतीने नाराज झाले. 


सुभाष चंद्र बोस यांनी 'दिल्ली चलो' चा नारा दिला. परंतु 18 ऑगस्ट 1945 मध्ये एका हवाई दुर्घटने दरम्यान त्याची मृत्यू झाली. नेताजींच्या मृत्युनंतर त्यांच्या शरीर सापडले नाही यामुळे त्यांच्या मृत्युच्या कारणावर आज देखील विवाद सुरू आहेत. परंतु या सर्वांमध्ये ही गोष्ट सत्य की आज जी आपण जय हिन्द ची घोषणा करतो, हे घोषवाक्य देखील नेताजींनी दिले आहे. जय हिंद जय भारत.