Advertisement

माझा आवडता ऋतू हिवाळा। हिवाळा निबंध मराठी। Winter essay information in Marathi.

माझा आवडता ऋतू हिवाळा | Winter essay in marathi (100 words)

हिवाळ्याची सुरुवात भारतात दसरा नंतर व्हायला लागते. पावसाळा समाप्तीच्या 2 महिन्यांनंतर हिवाळा सुरू होतो. या ऋतूत थंडी पासून रक्षणासाठी लोक जाड लोकरी चे स्वेटर वापरतात. उन्हाळ्यात पडणाऱ्या कडक उन्हापेक्षा हिवाळ्यातील थंडी मला जास्त आवडते. या ऋतूत दिवस लहान असतात 5 वाजेच्या सुमारास लवकर अंधार पडते. 


हिवाळ्यात खूप सारे पीक लावले जातात. हिवाळ्याला शरद ऋतू देखील म्हटले जाते. हा ऋतु शेतकऱ्यांसाठी पेरणीचा ऋतु असतो. भारतात लोक या ऋतुचा खूप आनंद मनवतात. मला हिवाळ्यात उष्ण मसालेदार चहा आणि पाकोडे खयायला आवडते. 


हिवाळ्यात शाळांना हिवाळी सुट्ट्या मिळतात. मुले खूप सारे खेळ जसे क्रिकेट, हॉकी, व्हॉलीबॉल ई. खेळतात. या ऋतूत सकाळी सकाळी धुक्या मुळे रस्ते झाकले जातात, बऱ्याचदा समोरून येणारी वाहने सुद्धा दिसत नाहीत. धूक्या मुळे बरेच दिवस लोकांना सूर्याचे दर्शन पण होत नाही.


माझा आवडता ऋतू हिवाळा | Winter Marathi Essay (200 words)

हिवाळा ऋतु भारतात नोव्हेंबर महिन्यापासून जानेवारी महिन्यापर्यंत राहतो. हा ऋतु सर्व ऋतुंपैकी सर्वाधिक थंड असतो. जानेवारी महिन्यात तर कधी कधी तापमान 1 अंश सेल्सिअस पर्यंत चालले जाते. हिवाळ्यात नोव्हेंबर महिन्यापासूनच थंड वारे वाहायला लागतात. थंडी पासून संरक्षणासाठी लोक गरम कपडे घालतात व रात्री जाड रजई पांघरूण झोपतात.


हिवाळा माझा आवडता ऋतू आहे कारणं या ऋतूत वातावरण पूर्ण थंड झालेले असते. सूर्याच्या तापत्या उष्णतेपासून मुक्ती मिळते. जेव्हा अधिक थंडी वाढायला लागते तेव्हा शाळेला हिवाळी सुट्टी दिली जाते. या ऋतूत लोक अधिक ऊर्जावान आणि क्रियाशील बनून जातात. न थकता जास्तीत जास्त काम करण्याचा उत्साह निर्माण होतो. या दिवसात रात्र मोठी व दिवस लहान होत जातात. 


भारतात हिवाळ्याचा हिमालय पर्वताशी संबंध आहे. जेव्हा हिमालयात बर्फ पडतो आणि उत्तरे कडून वारे वाहायला लागतात तेव्हा भारतात हिवाळ्याचे आगमन होते. हिवाळ्यात सकाळच्या वेळी धुके तयार होते, यामुळे बऱ्याचदा बाहेरचे काहीही दिसत नाही. म्हणून विमान, रेल्वे व इतर वाहतूक सेवा थांबवल्या जातात. हिवाळ्यात उत्तरे कडे बर्फ पडतो सोबतच कडाक्याची थंडी पण वाजते. लोक ठीक ठिकाणी आग लाऊन शेकोटी करतात. कडाक्याच्या या थंडीत गरीब लोक अधिक प्रभावित होतात. योग्य सुविधा नल्यामुळे बऱ्याचदा त्यांचा मृत्यूही होतो. सर्दी खोकला या सारख्या समस्या या ऋतूत मोठ्या प्रमाणात वाढायला लागतात.


गरम अन्न, फळ, मिठाई व स्वादिष्ट व्यंजन या ऋतूत खाल्ले जातात. अन्य ऋतुंच्या तुलनेत हिवाळ्यात चहा जास्त प्याली जाते. या ऋतूत भाजीपाला देखील जास्त असतो. दिवाळी, ख्रिसमस व नवीन वर्ष या सारखे उत्सव देखील हिवाळ्यातच येतात.


हिवाळा मराठी निबंध  (300 words)

दरवर्षी भारतात 3 ऋतु येतात. हिवाळा हा त्यातीलच एक ऋतु आहे. भारतात हिवाळ्याचा कालावधी नोव्हेंबर महिन्यापासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत असतो. नोव्हेंबर महिन्यात सुरु होणारी हलकी थंडक डिसेंबर येईपर्यंत भयंकर थंडी मध्ये बदलून जाते. हिवाळ्याच्या दिवसात दिवस लहान व रात्र मोठ्या असतात. सूर्याची जी उष्णता लोकांना उन्हाळ्यात आवडत नाही ती हिवाळ्यात अंगावर घ्यावीशी वाटते. थंडीपासून बचाव म्हणून काही लोक आगीचा देखील वापर करतात. 


हिवाळ्यात कधी कधी ढग आणि धुक्यामुळे सूर्याला पाहणे देखील कठीण होते. हिवाळ्यात कपडे सुखायला खूप वेळ लागतो. हिवाळ्यात धुके निर्माण होणे सामान्य गोष्ट आहे. हिवाळ्यात अधिक थंडीमुळे अनेक पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पलायन करतात. थंडीच्या दिवसात पहाडी क्षेत्र खूप सुंदर दिसू लागतात. या काळात काही ठिकाणी बर्फ पण पडते. नोहेंबर महिन्यात सणाच्या वेळी शाळेला हिवाळी सुट्या दिल्या जातात. यामुळे मुलांना खेळायला पुरेपूर वेळ मिळतो.


या काळात पर्वती भागात पडणार बर्फ खूप सुंदर दिसतो. हिवाळ्याच्या दिवसात झाडांची वाढ थांबून जाते. झाडांचे पान गळून पडतात. झाडांचा व पानांचा रंग रंगबिरंगी होऊन जातो. जो सर्वांचे मन मोहून घेतो. बऱ्याचदा हिवाळ्याच्या  दिवसात सकाळच्या वेळी धुक्यामुळे दूरचे दिसत नाही. मला हिवाळ्यातील धुक्याचे दृश्य पहायला आवडते. हिवाळ्यात दिवसभर थंडगार वारे वाहत राहतात. 


हिवाळा एकीकडे ज्याप्रमाणे सामान्य माणसासाठी आनंद निर्माण करतो तर दुसरीकडे गरिबाला याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. थंडी मुळे बरेच गरीब लोक आजरी पडतात. कारण हिवाळ्याच्या या थंडीत त्यांच्या कडे घालायला पुरेसे गरम कपडे नसतात. रस्त्यावर राहणाऱ्या बऱ्याच लोकांचा थंडी मुळे मृत्यू देखील होते. शासनाने गरिबांसाठी हिवाळ्याच्या काळात मदत पुरवायला हवी. 


हिवाळा हा एका पद्धतीने जीवनातील संघर्षांचा सामना करण्याची शक्ती प्रदान करतो. पर्यावरणासाठी सर्वच ऋतूंची आवश्यकता असते. हिवाळ्या च्या या दिवसात अनेक सण उत्सव देखील येतात म्हणून या काळात बाजारात गर्दी पाहायला मिळते. हिवाळा ऋतु सर्वच मनुष्य व पशू प्राण्यांना आवडतो. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला आळस न करता हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा अशा पद्धतीने प्रत्येक ऋतूत कार्य करत राहायला हवे.


माझा आवडता ऋतू हिवाळा (300 words)

हिवाळ्याचा ऋतु आरोग्यदायी आणि सुंदर असतो. या ऋतूची सर्वच भारतीय आतुरतेने वाट पाहत असतात. थंडीच्या दिवसात सूर्याची खूप कमी किरणे पृथ्वीवर पडतात. ज्यामुळे पृथ्वीवरील वातावरण थंड राहते. या काळात उत्तरी भागात बर्फ पडतो आणि याच काळात उत्तरी भागातून थंड हवा वाहू लागतात. या थंड हवेमुळेच संपूर्ण भारतात हिवाळा ऋतु सुरू होतो. 


हिवाळा ऋतु ची सुरुवात नोव्हेंबर महिन्यांपासून होते परंतु कडाक्याची थंडी डिसेंबर पासून जानेवारी पर्यंत पडत असते. मराठी महिन्यानुसार हिवाळा ऋतु कार्तिक, मार्गशीर्ष, पौष आणि माघ महिन्यात असतो. हिवाळ्याच्या ऋतु अन्य ऋतुंपेक्षा भिन्न असतो. या ऋतूत दिवसाचा कालावधी कमी व रात्र मोठी असते. या ऋतूत सकाळी सकाळी धुके पडलेले असते. ज्यामुळे समोरचे काहीच दिसत नाही. 


मला हिवाळ्याचा ऋतु खूप आवडतो. या ऋतूत थंडी जास्त असल्याने सर्व लोक स्वेटर, रूमाल, टोपी, कोट इत्यादी घालून ठेवतात. सकाळी सकाळी तर रजई मधून निघण्याची इच्छाच होत नाही. या ऋतूत पर्यावरण थंड आणि सुंदर असल्याने निरोगी राहण्यासाठी व्यायाम करण्याची सल्ला दिली जाते. या ऋतूत मी दररोज सकाळी उठून व्यायाम व रनिंग करतो. या काळात सकाळची शाळेचा वेळ 10 ते 4 करण्यात येतो. 


हिवाळ्यात लोक दुपारच्या वेळी घराच्या गच्चीवर जाऊन बसतात. सूर्याची उष्णता थंडी पासून आपले रक्षा करते. उन्हाळ्यात नकोसे वाटणारे ऊन हिवाळ्यात हवेहवेसे वाटते. संध्याकाळ होता बरोबर रजई मध्ये जाण्याची इच्छा होऊ लागते. आवडते गरमागरम अन्न खायायला लोकांना आवडते. गरमागरम जेवण केल्यावर टेलिव्हिजन वरील कार्यक्रम पाहत झोपण्याची मजाच वेगळी असते. 


थंडीच्या दिवसात चारही बाजूंना थंड हवा वाहत असतात. ज्यामुळे लहान मुले व म्हाताऱ्या लोकांना सावधानी बाळगावी लागते. रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने वृद्ध तसेच लहान मुलांना सर्दी खोकला होण्याची शक्यता असते. हिवाळ्याच्या दिवसात शेतकरी दिवसभर काम करतो. उन्हाळ्यापेक्षा त्याला हिवाळ्यात जास्त काम करता येते. हिवाळ्यात सर्वांचे आरोग्य चांगले राहते. या काळात पचनशक्ती चांगली असते. या ऋतूत व्यायाम केल्याने आरोग्य चांगले राहते. 


हिवाळ्याच्या ऋतूत आपल्या आवडीनुसार अनेक गोष्टींचा आनंद घेतला जाऊ शकतो. आईस स्केटिंग, आईस बाथिंग, आईस हॉकी, स्कींग इत्यादी खेळ खेळले जातात. या ऋतूत आपण जास्तीत जास्त व्यायाम करायला हवा व निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक भोजन करायला हवे.