Skip to main content

[निबंध] मकर संक्रांति मराठी निबंध । Essay On Makar Sankranti in Marathi.

माझा आवडता सण मकर संक्रांत मराठी निबंध (Majha avadta san makar sankranti) 

मकरसंक्रांत हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे, या दिवशी सूर्य हा उत्तर राशीत प्रवेश करतो. या सणाची विशेषता ही आहे की दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीलाच हा सण साजरा होतो. मकरसंक्रांतीचा संबंध पृथ्वीच्या भूगोल आणि सूर्याच्या स्थितीशी आहे. दरवर्षी सूर्य 14 जानेवारीलाच मकर रेखे वर येतो. यामुळे मकर संक्रांत देखील 14 जानेवारीला साजरी केली जाते. 


भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रात मकर संक्रांतीला वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जाते. महाराष्ट्रात संक्रांतीला मकर संक्रांत म्हटले जाते. आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटक मध्ये याला संक्रांति असे म्हटले जाते. तमिळनाडूमध्ये याला 'पोंगल' पर्व म्हटले जाते. पंजाब आणि हरियाणा मध्ये नवीन पिकाचे स्वागत करत लोहडी सण साजरा केला जातो. आसाम राज्यात बिहू नावाने मकर संक्रांतीच्या या सणाला साजरे केले जाते. भारतातील प्रत्येक राज्यात मकरसंक्रांतीचे नाव व साजरे करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. 


वेगवेगळ्या प्रदेशानुसार मकर संक्रांतीत बनवले जाणारे व्यंजन वेगवेगळे असतात, परंतु तीळ आणि गुळाचे या दिवशी विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सुगंधित उटने लाऊन आंघोळ केली जाते. यानंतर तिळगुळाचे लाडू बनवले जातात. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याच्या रीवाज देखील आहे.  विशेष करून गुजरात व राजस्थान या राज्यांमध्ये पतंग उडवली जाते. 


मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ खाण्याचे महत्त्व देखील आहे. मकर संक्रांत थंडीच्या दिवसात येते या काळात तीळ गूळ खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते. म्हणून या दिवशी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण तिळगुळ वाटतात. इत्यादी अनेक कारणांमुळे माझा आवडता सण मकर संक्रांत आहे.


मकर संक्रांति मराठी निबंध (Makar sankranti marathi essay nibandh)

आपल्या देशात दरवर्षी खूप सारे सण साजरे केले जातात. सणांमुळे लोकामध्ये एकतेची भावना व आनंद वाढतो. भारताच्या प्रमुख सणापैकी मकर संक्रांत हा एक सण आहे. हा सण दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला साजरा केला जातो. या दिवसाला एक दुसऱ्याला तिळगुळ देऊन साजरे केले जाते. मकरसंक्रांत हा सण भारतासह नेपाळ, बांगलादेश आणि जगभरात जिथे कुठे हिंदू धर्माचे लोक राहतात तेथे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. शेतकऱ्यांसाठी हा सण विशेष असतो कारण यादरम्यानच शेतातील पिक कापले जाते. 


संक्रांत ही सूर्याच्या उत्तरायण होण्याने साजरी करतात. उत्तरायण हे देवतांचे अयन असते. यादिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून याला 'मकर संक्रांत' पण म्हटले जाते. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. मकर संक्रांती नंतर दिवस मोठे व रात्र लहान होत जातात. आपल्या देशात वेगवेगळ्या सणाना वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. मकर संक्रांतीच्या दिवशी देखील तिळगुळ बनवून खाल्ले जाते. या दिवशी लहान मोठे सर्वच जण तिळगुळ वाटप करतात. तिळगुळ देताना "तिळगुळ घ्या, गोड गोड बोला" असे देखील म्हटले जाते. थंडीच्या दिवसात तीळ गुळ खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते. या दिवशी लहान मुले आई वडील तसेच मोठ्याचा आशीर्वाद प्राप्त करतात.


मकर संक्रांतीच्या दिवशी उडवण्याचे देखील महत्त्व आहे. विशेष करून गुजरात व राजस्थान या राज्यांमध्ये पतंग उडवली जाते. या दिवशी पतंग उडवणे मागे करमणूक हा उद्देश असला तरी थंडीच्या दिवसात पतंग उडवल्याने शरीराला सूर्याची उष्णता मिळून डी जीवनसत्व प्राप्त होते. यामुळे डी जीवनसत्व अभावी होणाऱ्या शारीरिक समस्यांपासून आपण दूर राहू शकतो.


अशा पद्धतीने मकर संक्रांतीचे महत्त्व आहे. हा दिवस स्नान व गरिबाला दान करून पुण्य मिळवण्याचा असतो. म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा पाठ, दान आणि स्नानाचे महत्त्व आहे व या दिवशी आपण सर्वांनी संकल्प करायला हवा की आपण एक दुसऱ्याशी गोड गोड बोलु.