Advertisement

रक्षाबंधन मराठी निबंध | Essay on Raksha Bandhan in Marathi

रक्षाबंधन मराठी निबंध - Raksha Bandhan Nibandh in Marathi (200 words)

रक्षाबंधन हा हिंदू धर्माच्या एक प्रमुख सण आहे. हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाला रक्षासुत्र, म्हणजेच राखी बांधते आणि भावाची प्रगती व सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करते. भावाकडून पण बहिणीला संरक्षणाचे वचन दिले जाते. राखीच्या या सणाला संपूर्ण भारतात साजरा करतात. भारतासह नेपाळ व अन्य ज्या ज्या ठिकाणी हिंदू धर्माला मानणारे लोक राहतात तेथे साजरे केले जाते.  


रक्षाबंधन या सणाला प्राचीन काळापासून साजरे केले जात आहे. अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये रक्षाबंधनच्या उल्लेख केला आहे. आजकाल रक्षाबंधनच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या घरी राखी व मिठाई घेऊन जातात. राखी बांधल्या नंतर भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून काही पैसे किंवा उपहार भेट देतो. अश्या पद्धतीने एक दुसऱ्याला वस्तू दिल्याने भाऊ बहिणी मध्ये प्रेम वाढते.


रक्षाबंधनच्या दिवशी सर्वजण नवे कपडे परिधान करतात. सर्वांचे मन आनंदाने भरून जाते. रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी बहिणी बाजारात जाऊन चांगल्या प्रकारच्या राख्या भावांसाठी खरेदी करतात. भाऊ सुद्धा बहिणीसाठी काहीतरी उपहार विकत आणतात. 


रक्षाबंधन हा बहीण भावाचे प्रेम टिकवून ठेवण्याचा सण आहे. हिंदू धर्मात असे अनेक सण परंपरा फार पूर्वी पासून सुरु आहेत. ह्या परंपरा आपल्या संस्कृतीचा भाग आहेत आणि रक्षाबंधन देखील त्यातील आज एक सुंदर परंपरा आहे. म्हणूनच माझा आवडता सण रक्षाबंधन आहे.


रक्षाबंधन मराठी निबंध (Raksha Bandhan essay in Marathi) 

रक्षाबंधनाचा सण प्रत्येक वर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. हा सण भाऊ-बहिणीचे प्रेम आणि कर्तव्याच्या प्रतीक असतो. या दिवशी बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात. भाऊ देखील बहिणीला सदैव संरक्षणाचे वचन देतो. रक्षाबंधनाचा हा सण आपल्या देशात प्राचीन काळापासून साजरा केला जात आहे. 


रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी सकाळी लवकर अंघोळ करून पूजेचे ताट सजवतात, पूजेच्या ताटात कुंकू, राखी, अक्षदा, दिवा, मिठाई इत्यादी वस्तू ठेवल्या जातात. त्यानंतर घराच्या पूर्व दिशेला भावाला बसवून त्याची आरती ओवाळली जाते, डोक्याला कुंकू व अक्षदा लाऊन बहीण भावाला राखी बांधते. आणि शेवटी गोड मिठाई खाऊ घातली जाते. भाऊ सुद्धा बहिणीला मिठाई खाऊ घालतो व बहिणीसाठी आणलेले उपहार तिला भेट देतो. 


पूर्वीच्या वेळी रक्षाबंधन अतिशय सात्विक पूजा पद्धतीने साजरी केली जायची. परंतु आता वेळेच्या अभावाने पूजा पद्धतीत बदल केलेले आहेत. आता लोक पूर्वीपेक्षा या सणात कमी सक्रिय होतात. दूर राहणाऱ्या बऱ्याच बहिणी रक्षाबंधनच्या दिवशी भावाला कुरियरने राखी पाठवून देतात. याशिवाय मोबाईल वर राखी पाठवून सुद्धा रक्षाबंधनच्या शुभेच्छा देखील दिल्या जातात.


स्वतःला मॉर्डन दाखवण्यासाठी आपण आपली संस्कृती विसरत आहोत. आपण आपल्या पूजा पद्धती मध्ये बदल केलेला आहे. जर आपल्याला भारतीय संस्कृतीचे रक्षण करावयाचे तर जुन्या पद्धती अनुसार सण-उत्सव साजरे करायला हवे. रक्षाबंधनच्या पवित्र सणाचे महत्व लक्षात घेऊन त्याला योग्य रीतीने साजरे करायला हवे.